Tuesday 4 July 2023

त्यागातच खरे सुख ! - सिद्धगिरी दैनंदिनी

त्यागातच खरे सुख !

अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज 

'त्यागेन एकेन अमृतत्व मानषु:, न धनेन, न दानेन, न प्रजया' असा एक विचार आहे. यानुसार खरे सुख भोगात नाही, तर त्यागात आहे. त्यागाने मनाला सुख, शांती मिळते, म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहे. जगात त्यागवादी व्यक्ती पूजनीय असतात, भोगवादी नव्हे. यावरून आपण यातील काय व्हावे, हे प्रत्येकाने ठरवायला हवे. जगात दोन प्रकारची जीवनप्रणाली आहे. सुख मिळविण्याचे दोन प्रकार आहेत. एक भोगाने आणि दुसरे त्यागाने. त्याग आणि भोग दोन्ही शब्द सापेक्ष आहेत. भोगाने सुख मिळते, असे समजून काही जण कोणत्याही स्तराला जाण्यास तयार असतात. मुळात भोग हा एकेंद्रिय नाही. तो सर्व इंद्रियांचा विषय आहे. कानाचा भोग आहे शब्द, डोळ्यांचा रूप, नाकाचा गंध, जिभेचा स्वाद आणि त्वचेचा भोग स्पर्श आहे. यासाठी काही जण वाटेल ते करायला तयार असतात. इतिहासातील अनेक घटना याचा साक्ष आहेत.


भोगासाठीच इतिहासात हजारो लढाया झाल्या. अनेकांनी कोर्ट-कचेरी केली. काही देशांत अराजकता निर्माण झाली. भोगवादी अनेकदा इतरांचा सर्वनाश करतात. काही वेळा तर स्वत:चाही. भूतलावरील जीवसृष्टीचा येथील प्रत्येक गोष्टीवर समान अधिकार आहे; तथापि माणसांच्या कर्माने दोन लाख प्रजातींचा नाश झाला. जे आहे, ते सर्व माझेच आहे, या स्वार्थी आणि भोगवादी वृत्तीने मानव केवळ शोषण करीत आहे.

भोगाने ना समाधान मिळते ना तृप्ती. अग्नीत तूप टाकले, की ती शांत होत नाही; अधिक भडकते. असेच भोगाचे आहे; त्यामुळे रोज पोट भरण्यासाठी दोन भाकरी लागत असताना, दोन कोटी रुपये दिले तरी समाधान वाटत नाही. अजून मिळेल का, याच आशेवर माणूस राहतो. त्यासाठी धडपडतो. मानवाच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता निसर्गात आहे. दुराशा पुरविण्याचे सामर्थ्य मात्र नाही. 'भोगवादाने माझा विकास झाला,' असे कुणी म्हणत असेल, तर तो आभास आहे. सुखाने जगायचे असेल, तर वास्तवाचे भान हवे. निसर्गातील सर्व जीव एकमेकांसाठी काही ना काही त्याग करूनच नैसर्गिक संतुलन राखतात. माणूस हा एकमेव जीव त्याग कमी आणि भोग अधिक घेतो. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. यापुढे हा समतोल राखायचा असेल, तर त्यागाची वृत्ती वाढायला हवी. ती ज्याच्याकडे असते, तेच पूजनीय ठरतात. महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्यासारख्या अनेकांनी त्याग केला, म्हणून ते पूजनीय ठरले. जगात श्रीमंती विकत घेता येते, पूजनीयता नाही; एवढे लक्षात ठेवले, तरी भोगवादी दुनिया त्यागवादी होईल.


आनंदाचा क्षण! - सिद्धगिरी दैनंदिनीतून

 

आनंदाचा क्षण!



अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी
आनंद हा शब्द सर्वांना परिचित आहे. त्याच्या प्राप्तीसाठी रात्रंदिवस सर्वांचे प्रयत्न सुरू असतात; पण तो प्रत्येकाला मिळतो असे नाही. अनेकदा त्याचा अर्थच माहीत नसल्याने, तो मिळविण्यासाठी विनाकारण धडपड सुरू असते. अशा वेळी 'काखेत कळसा, गावाला वळसा' अशी स्थिती होते. आनंद म्हणजे सुख आणि दु:ख या पलीकडे असणारी गोष्ट आहे. सुख म्हणजे अनुकूल आणि दु:ख म्हणजे प्रतिकूल वेदना. इष्ट वस्तूची प्राप्ती म्हणजे सुख आणि अनिष्ट विषयाची प्राप्ती म्हणजे दु:ख. प्रिय गोष्टींचा संयोग म्हणजे सुख आणि अप्रिय गोष्टींचा संयोग म्हणजे दु:ख. या गोष्टी कधीच चिरंतन नसतात. त्यांची ये-जा सुरू असते आणि हे स्वाभाविक आहे.

मान आणि मरण या गोष्टी गेल्यानंतर परत येत नाहीत; त्यामुळे त्यांना सांभाळायचे आहे. सुख आणि दु:ख, आनंद आणि किर्ती येतात-जातात. फक्त ते आपण जाणून घ्यावे लागते. कीर्ती आणि आनंद आपल्या मानण्यावर आहे, म्हणून ते सुख-दु:खाच्या पलीकडे आहे. आनंद हा विषयावर अवलंबून राहत नाही; तो आपल्या मनाच्या मानण्यावर असतो. खूप कमावले आणि मनानेच ते मान्य केले नाही, तर तो आनंद नव्हे. आनंद आपल्या अंतरंगात आहे; परंतु आपण त्याला शब्द, स्पर्श, गंध, रस अशांत शोधत असतो. मुळात मानले, तर प्रत्येक विषयात आनंद आहे; न मानल्यास कशातही नाही.

आनंद हा अपरिमित संतोष आहे. त्याला देश, काल, वस्तूंची सीमा नाही. त्याच्या शोधासाठी खूप जण प्रयत्न करीत असतात. हे करताना कधी कधी ध्येय विसरतात. आनंद मिळवण्यासाठी कोट्यवधींचा प्रवास सुरू असतो; पण त्याच्या पत्त्यावर पोहोचतात शेकडोच! ध्येय विसरून वाटचाल करणारा कधीच यशस्वी होत नाही आणि आनंदीही. एकदा एका गल्लीत चोर चोरी करीत होता. शेजाऱ्यांना त्याची कुणकुण लागली. शेजारी उठल्याने चोर पळू लागला. त्याला पकडण्यासाठी चांगला धावपटू असलेला युवक पाठलाग करू लागला. पुढे चोर, मागे हा धावपटू. दोघांची जणू शर्यतच. पाठलाग करता करता धावपटू ध्येयच विसरून गेला. चोराला पकडायचे सोडून, त्याला मागे टाकून, तो पहिला क्रमांक मिळविण्यासाठी पुढे पोहोचला. यामुळे चोर निसटला. अनेकांचे आयुष्य असे ध्येयहीन आणि दिशाहीन झाले आहे. ध्येयाने वाटचाल करीत, नव्या इच्छा आकांक्षांना कवेत घेण्याचा प्रयत्न केल्यास जगात सर्वांत आनंदी आपणच असणार आहोत. मनाला भूत आणि भविष्याकडे धावण्यापासून थांबवत, प्रत्येक विषयात आनंद मानण्याइतके त्याला परिपक्व, मजबूत केल्यास, सर्वांत आनंदी आपणच असणार आहोत.

मान-सन्मान 

अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

राजा असो की प्रजा, गरीब असो की श्रीमंत, लहान असो की मोठा, प्रत्येकाला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. जगात वावरताना प्रत्येकाला वाटते, की आपला सन्मान व्हावा, मान मिळावा. यात काहीच गैर नाही; पण सत्काराचे, कौतुकाचे हार स्वीकारताना आपली समाजाप्रती काही कर्तव्ये असतात. सुजाण नागरिक म्हणून काही जबाबदारी असते. या जगात मान दिला, तर सन्मान नक्की मिळतो. अहंकार, मीपणा बाजूला ठेवून एकमेकांचा सन्मान केला, तर आपण सारेच सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगू शकतो.

'जगा आणि जगू द्या'या तत्त्वाप्रमाणे, 'एकमेकांचा मान-सन्मान ठेवा, माणसांचा आदर करा' हे साधे सूत्र पाळल्यास कुणी आपल्याकडे बोट दाखविणार नाहीत. मुळात आपल्याला कुणी वाईट म्हणू नये, असे वर्तन करण्याची जबाबदारी आपलीच आहे. इतरांना मान दिला म्हणून आपला मान कमी होतो, किंवा पैसे जातात, आर्थिक नुकसान होते असे काही आहे का? मग एकमेकांचा सन्मान करायला आपण कमी का पडायचे? आत्मसन्मान हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तो टिकविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. सन्मानाने जगताना दुसऱ्यांच्या भावना दुखावण्यात वेळ घालवू नये. परस्परांमध्ये द्वेष, मत्सर, ईर्ष्या, वैर, कपट हे सारे विसरण्याची गरज आहे.

जगज्जेता सिकंदरने पराभूत झालेल्या राजा पोरसला विचारले, 'तुमची इच्छा काय आहे?' त्यावर तो म्हणाला, 'मला राजाप्रमाणे वागव.' हे ऐकून सिकंदर जिंकलेले राज्य परत त्याला परत देऊन गेला. यात आत्मसन्मान आणि दुसऱ्याप्रती सन्मान या दोन्हींचे दर्शन घडते. सन्मानाने जगण्यासाठी काय लागते? अन्न, वस्त्र आणि निवारा मिळाला की झाले. जादा हव्यासापोटी अनेकदा काही जण लाचार होतात. जीवनात इज्जत मोलाची. ती एकदा गेली, की परत मिळत नाही आणि जगाच्या बाजारात विकतही मिळत नाही. अनेकदा घरातील व्यक्तींना मोठे म्हणण्याइतका मनाचा मोठेपणा आपण दाखवत नाही. खिशात चार पैसे आल्यावर अनेकांची चाल बदलते. हल्ली श्रीमंती पाहून मान देण्याची प्रथा आहे; पण त्यापेक्षा ज्ञानी, समाजसुधारक, साधू, संतांना अधिक मान मिळायला हवा. एकमेकांचा सन्मान केल्यास मैत्री नुसती टिकत नाही, तर बहरते. कोणत्याही नात्यात हे सूत्र लागू पडते. एकमेकांच्या धर्माचा, भावनांचा, मतांचा, संस्कृतीचा सन्मान व्हावा. दुसऱ्यांचा आदर करण्याची, सन्मान ठेवण्याची सुरुवात घरात करावी. 'सन्मान द्या आणि मान घ्या' या तत्त्वानुसार वागल्यास कुणाच्याही आत्मसन्मानाला धक्का लागणार नाही.


OPTHO CAMP PROMOTION

#दृष्टी असेल तर सृष्टी दिसेल 
#मोफत मोतीबिंदू शत्रक्रिया शिबीर 


 बालसंस्कार




घरात बाळ जन्माला आलं, की सर्वांनाच आनंद होतो; पण त्यानंतर जन्मदात्यांची जबाबदारी वाढते. त्याला सुशिक्षित, सुसंस्कारित करण्यासाठी आणि पुढं त्यानं परिवाराचा नावलौकिक वाढवावा यासाठीच ही धडपड असते. बाळाला जन्म देत मातृपितृ ऋणातून मुक्त झाल्याचा आनंद एकीकडे आणि बाळाला सुसंस्कारी करण्याची जबाबदारी दुसरीकडे, अशा दुहेरी भूमिकेत ते असतात. बाळावर संस्कार करण्याचा क्रम ठरलेला असतो. जन्मापासून पाच वर्षांपर्यंत प्रेमानं पालन-पोषण करणं आवश्यक असतं. या काळात त्याला पाप-पुण्य, सहकार-असहकार, राग-द्वेष, चांगलं-वाईट यांतील काहीही कळत नसतं. पाहायला आणि ऐकायला असणाऱ्या अप्रिय गोष्टी बाळासमोर करू नये. बाळाला रागवणं आणि लाड करण्याची वेळ ठरलेली आहे. पाच वर्षं लाडात, प्रेमात वाढवणं, त्याला प्रेमाची असलेली अपेक्षा पूर्ण करणं महत्त्वाचं.

वयाच्या पाच ते पंधरा वर्षांपर्यंत प्रेमाबरोबर अनुशासन महत्त्वाचं आहे. सहाव्या वर्षापासून प्रेमाबरोबर थोडं कडकपणे वागवावं. नियोजन, शिस्त आणि संयमाचा उत्तम पाठ आहे. नात्याबरोबरच समाजातील चांगलं-वाईट, ज्ञान-अज्ञान, फायदा-तोटा, धर्म-अधर्म, कर्तव्य, जबाबदारी, जग, निसर्ग, परिवार, समाज यांच्याशी नातं या सर्वांची या वयात ओळख करून द्यावी. शाळेत जे मिळणार नाही, ते पालकांकडून मिळत असतं. ते देण्याची जबाबदारी त्यांची आहे. निसर्ग नावाच्या विद्यापीठात बऱ्याच विद्या असतात. प्रत्येक इंद्रियाचा व्यवहार शिकवावा लागतो. सोळाव्या वर्षानंतर त्याला मित्रासारखं वागवावं. मित्राप्रमाणे सल्ला द्यावा. संस्कारांच्या मुशीत तयार करावं. अनेकदा त्याला हित-अहित माहीत नसतं; त्यामुळे त्याला विश्वासानं, श्रद्धेनं माहीत करून द्यावं. तो वाईट संगतीला लागू नये, वाया जावू नये याची काळजी घेणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे, यासाठी जे जे आदर्श आहे, ते ते त्याच्या समोर ठेवावं. बाळ ही पारिवाराची संपत्ती आहे, परिवाराचा बोजा होऊ नये, एवढी काळजी घ्यायलाच हवी.




एका गुन्हेगारास मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते. त्याला जेलर शेवटची इच्छा विचारतो; तेव्हा आईला भेटण्याची इच्छा असल्याचं तो सांगतो. आई समोर आल्यानंतर, आजच्या स्थितीला तीच जबाबदार असल्याचा आरोप तो करतो. पहिल्या चोरीच्या वेळी तू अडवलं असतंस, तर भविष्यात मोठा गुन्हेगार झालो नसतो, असा ठपका तो तिच्यावर ठेवतो. यावरून एक गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे मुलांवर योग्य वेळी योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपलीच आहे.

MAY TIMELINE

#1 MAY 
    INTERNATIONAL WORKER'S DAY
    जागतिक कामगार दिवस 


#1 MAY 
    INTERNATIONAL WORKER'S DAY
    जागतिक कामगार दिवस 

#3 MAY 
   अक्षयतृतीया


#8 MAY 
   WORLD RED CROSS DAY 

#8 MAY 
   HAPPY MOTHER'S DAY
   जागतिक मातृ दिन 

#11 MAY 
   WORLD SCIENCE & TECHNOLOGY DAY 
   जागतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान दिवस

#12 MAY 
   HAPPY NURSES DAY 
   जागतिक परिचारिका दिवस 


#21 MAY 
   WORLD ANTI TERRORISM DAY
   जागतिक दहशतवाद विरोधी दिवस


 

JUNE TIMELINE

#1 JUN
    WORLD MILK DAY 
    जागतिक दूध दिवस 

#3 JUN
    WORLD BICYCLE DAY
    जागतिक सायकल दिवस 


#5 JUN
    WORLD ENVIRONMENT DAY
    जागतिक पर्यावरण दिवस 


#8 JUN
    WORLD OCEAN DAY
    जागतिक महासागर दिवस 

#10 JUN
    WORLD EYE DONATION DAY
    जागतिक नेत्रदान दिवस 

#12 JUN
    WORLD DAY AGAINST CHILD LABOUR 
    जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस 

#14 JUN
    WORLD BLOOD DONOR DAY
    जागतिक
 रक्तदाता दिवस 

#15 JUN
    NATURE PHOTOGRAPHY DAY
    
निसर्ग फोटोग्राफी दिवस 

#18 JUN
    RANI LAXMIBAI
    
राणी लक्ष्मीबाई

#19JUN
    HAPPY FATHER DAY 
    पितृदिनाच्या शुभेच्छा

#21 JUN
    INTERNATIONAL DAY OF YOGA 
    आंतरराष्ट्रीय योग दिवस 

#26 JUN
    CHHATRAPATI SHAHU MAHARAJ
    छत्रपती शाहू महाराज 


त्यागातच खरे सुख ! - सिद्धगिरी दैनंदिनी

त्यागातच खरे सुख ! अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज   'त्यागेन एकेन अमृतत्व मानषु:, न धनेन, न दानेन, न प्रजया' असा एक विचार आहे. यानुसार ...